HW News Marathi
महाराष्ट्र

अनुसया शासकिय महिला वसतीगृह अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा घर

उत्तम बाबळे नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अत्याचार पिडीत महिलांसाठी कार्यरत आहे. अशा महिला समस्यांचे निराकरण होईपर्यंत येथे आश्रय घेऊ शकतात, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

या संस्थेत १८ ते ६० वर्षे या वयोगटातील निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत, कुमारीमाता, परितक्त्या , अत्याचार पिडीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली केली जाते. तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. १८ वर्ष वयांवरील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टया सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांच्या विवाहाकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समस्याग्रस्त महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गानी न जाता समस्येचे निराकरण होईपर्यत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा फायदा घ्यावा. येथे प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी १:०० ते ३:०० या वेळेत अधिक्षक, माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) भाईजी, पॅलेसच्या पाठीमागे, शिवाजीनगर उडडाणपुल परिसर शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात कुठेही अन्नधान, फळ भाजीपालासह औषधांचा तुटवडा भासणार नाही, राज्य सरकारची माहिती

News Desk

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

News Desk

पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही ‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? रोहित पवारांचा भाजपला सवाल 

News Desk
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

शिक्षकाने केला विद्यार्थींनीचा विनयभंग

News Desk

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

News Desk

ऑफिस मध्ये डेस्क योगा

swarit