HW News Marathi
महाराष्ट्र

पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही ‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? रोहित पवारांचा भाजपला सवाल 

मुंबई | रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना सवाल केला आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करून टीका केली होती. मात्र, अर्णब यांचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर भाजपानं या प्रकरणावर गुळणी धरली असून, रोहित पवारांनी वर्मावरच बोट ठेवलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आणि बोलणाऱ्या भाजपा नेत्यांना रोहित पवार यांनी सवाल केला आहे. त्याचबरोबर अर्णब गोस्वामी यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करणार की, पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

“लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं. फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’,” असा सवाल रोहित पवारांनी भाजपला केला आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट असलेला स्क्रीनशॉट ट्विट करत चिंता व्यक्त केली होती. “कथित पत्रकाराला भाजपाच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपाच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे,” असं रोहित पवार म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

News Desk

जयंत पाटील भर पावसात भिजले आणि सातारच्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली…

News Desk

राज्यपाल नियुक्त आमदार ठरण्याची शक्यता, राष्ट्रवादी राजू शेट्टीना दिलेला शब्द पाळणार?

News Desk