HW News Marathi
महाराष्ट्र

पीक विम्याची रक्कम थकीत कर्ज म्हणून वसूल करण्याचे आदेश

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा सहकार विभाग व बँकांचा प्रकार

प्रतिनिधी। मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधीपक्ष जिवाचे रान करत असताना निर्ढावलेले राज्य सरकार काही केल्या त्यांना दाद देत नाही. अशातच शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सहकार विभागाने केला आहे. पीक विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्यातील पन्नास टक्के रक्कम थकीत कर्जाचा हप्ता म्हणून वसूल करण्याचा तुघलकी आदेश सहकार विभागाने काढला आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबलेला नसून रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीतून जमा केलेली रक्कम देखील थकीत कर्ज वसुलीसाठी गोठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सलग तीन-चार वर्षे दुष्काळाचा सामना केल्यानंतर या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकरी काहीसा सुखावला होता. तरीही अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घेतला होता. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याऐवजी बँकांनी ही रक्कम थकीत कर्ज म्हणून वळती करण्याचे लेखी पत्र सहकार व पणन विभागाने बँकांना दिले आहेत. या मुळे शेतकरी संतप्त झाला आहे. शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास तयार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसाही शासन शेतकऱ्यांच्या हाती देण्यास तयार नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीतून आलेली रक्कम बँक खात्यात जमा केली होती. ती रक्कम बँकांना गोठवून शेतकऱ्यांना जुन्या कर्जाची थकीत रक्कम भरण्याची मागणी केली आहे. कष्टाचा पैसा बँका आणि सहकार विभागामुळे शेतकऱ्यांना मिळत नाही. या प्रकाराबाबत बँका व सहकार विभाग मूग गिळून गप्प असून यावर प्रतिक्रीया देत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“एखाद्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचं संस्कार आमच्या रक्तात नाही!” – पंकजा मुंडे

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

News Desk

एसटी आणि वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड !

News Desk
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक!

News Desk

नांदेड-मुंबई विमानसेवा 1 मे पासून सुरू

News Desk

“हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा” – उदयनराजे भोसले

News Desk