HW News Marathi
महाराष्ट्र

माझा बाॅडीगार्ड मारहान केली नाही : एकनाथ शिंदे

मुंबई :घोटी येथील टोलनाक्यावर मध्यरात्री घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. मात्र, बेदम मारहाण झाल्याचे जे चित्र रंगवले जात आहे, ते देखील वस्तुस्थितीला धरून नाही. टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे गाड्या सोडा, असं वारंवार सांगू देखील गाड्या सोडल्या जात नव्हत्या. त्यामुळे माझ्या सुरक्षारक्षकाने टोल ओपॅरेटरचं लक्ष वेधण्यासाठी टोल बूथवरील काचेवर थाप मारली असता ती काच तुटली. काच कमकुवत झाल्यामुळे तुटली असावी. त्या काचेचा तुकडा उडून तेथील कर्मचाऱ्यांच्या नाकाला इजा झाली. मात्र, त्यात कोणालाही जाणूनबुजून इजा करण्याचा हेतू नव्हता.. हा प्रकार मला उशिरा, ठाण्यात आल्यावर समजला. मी संबंधित सुरक्षारक्षकाला समज दिली आहे. या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज देखील मागवले आहे. त्यात जो दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक वाहतूक)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री आज १.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

अॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू

News Desk

भाजप सरकारची धोरणे शेतकरीविरोधीः खा. अशोक चव्हाण

News Desk
मुंबई

सेंट झेवियर्समध्ये ‘आमोद’ची ‘पखरण’

News Desk

मराठी वाङ्मय मंडळाच्या दिमाखदार महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – १९२३मध्ये स्थापन झालेल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे यंदा ९३वे वर्ष. या वर्षात मंडळाने अनेक उपक्रम राबवले. त्यात झेवियर्स महाविद्यालयामध्ये १९,२० आणि २१ जानेवारी रोजी झालेला आमोद हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विशेष उल्लेखनीय ठरला. या दिमाखदार महोत्सवाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी वाङ्मय मंडळ आयोजित या महोत्सवात एकूण दहा स्पर्धा रंगल्या. विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात आपली कलाकारी सादर केली. आमोदचे यंदाचे ५वे वर्ष होते. त्याचे मुख्य ठरले स्पर्धांमधली विविधता. ललित कला अंतर्गत पोस्टरबाजी आणि कार्टून फॅक्टरी तसेच साहित्य कला अंतर्गत काव्य नाटुकली या नव्या स्पर्धा होत्या. त्यामुळे त्यांबद्दल विशेष उत्सुकता दिसली. ब. न. पुरंदरे वक्तृत्व स्पर्धा म्हणजे आमोदचे विशेष वैशिष्ट्य. या स्पर्धेच्या विजेत्यांना चांदीचा फिरता चषक देण्यात येतो. यंदा हा मान टी. एम. लॉ कॉलेजने पटकावला. महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्य स्पर्धेत स्पर्धक संघांनी बहारदार सादरीकरणे केली. स्पर्धांतला हा उत्साह पारितोषक वितरण समारंभातही कायम होता. आपआपल्या कॉलेजच्या विजेत्यांना चिअर अप करण्यासाठी एकच जयघोष सुरू होता.

या वर्षी आमोदमधील सर्वच स्पर्धा चुरशीच्या झाल्या. सर्वच कॉलेजांनी अव्वल क्रमांकासाठी मेहनत घेतली. एकपात्री अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

आमोदच्या निमित्ताने मराठी वाङ्मय मंडळ च्या वार्षिक अंक ‘पखरण’चेही प्रकाशन झाले. या अंकामध्ये झेवियर्सच्या स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे लेख असून त्यांच्या लेखन कौशल्याला वाव देणारा हा उपक्रम होता.

Related posts

माटुंग्यातील बिग बाजारमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

News Desk

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk

मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली,जेष्ठ नागरिकांना लिफ्टमधून काढले बाहेर ,विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया

swarit