HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याजदरानं पीककर्ज

नवी दिल्ली – नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलत देत कमी दरात पीककर्ज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळं देशभरातील शेतकऱ्यांना पीककर्जातून थोडासा दिलासा मिळणार आहे. आजवर शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजदरानं पीककर्ज दिलं जात होतं, त्यापैकी पाच टक्के व्याजदरात आता सरकार सवलती देणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 4 टक्के व्याजदरानं पीककर्ज उपलब्ध होणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आता पीककर्जावर 2 टक्के अनुदान आणि वेळेवर कर्ज भरल्यास 3 टक्के सवलत, अशी एकूण पाच टक्के रक्कम सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज 9 टक्के दराने दिलं जातं. मुद्दल रक्कमेपेक्षा व्याजाचं ओझंच जास्त झाल्याने कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र एका वर्षासाठी घेतलेलं कर्ज कमी दरात देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनासाठी सरकारच्या तिजोरीवर 19 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

पीक कर्जावरील 5 टक्के रक्कम सरकार देणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने मिळणारं कर्ज आता 4 टक्के व्याजदरानं मिळणार आहे. एका वर्षासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. जास्तीत जास्त 3 लाख रुपये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर भार पडणार असल्यानं सरकारनं चालू आर्थिक वर्षासाठी 20 हजार 339 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार! – नितीन गडकरी

Aprna

रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

News Desk

कोरोना लढाईतील ठाणेकरांचं काम मार्गदर्शक असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य!

News Desk
शिक्षण

उल्हासनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून तुफान हाणामारी

News Desk

गौतम वाघ

उल्हासनगर – राजकारणाशी संबंध नसलेल्या परिवारातील पूजा कौर लबाना ही तरुणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आल्याच्या रागातून शीख समुदायाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना काल रात्री उल्हासनगरात घडली आहे. नगरसेविकेच्या नातलगांना स्कार्पिओच्या धडकने गंभीर जख्मी करण्यात आले आहे. दोन्ही गटांच्या तलवारबाजीने कॅम्प 5 मच्छी मार्केट मध्ये तणावाचे वातावरण पसरले असून 11 जण जख्मी झाले आहेत. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा कौर लबाना ह्या राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांच्या पॅनल मधून निवडून आल्या आहेत. याचा राग विरोधी गटाला आला होता. पूजा कौर यांच्या वडिलांचं मच्छी मॉर्केट मध्ये मटणाचे दूकान आहे. दुस-या गटाने काही दिवसां पूर्वी या मटणाच्या दुकानाला अडथळा होण्याच्या हेतुने चायनीज गाडी लावली होती. त्यातून वाद झाल्यावर त्याची तक्रार पूजा कौरच्या वडिलांनी केली असता, दुस-या गटावर गुन्हा दाखल झाला होता. याच रागातून काल रात्री पूजा कौर यांच्या नातलगांच्या अंगावर दुस-या गटाने स्कार्पिओ कार नेऊन त्यांना जख्मी केले. तसेच बेकायदेशीर जमाव जमवून आणि तलवार,चॉपरने चौघांवर वार केले. विशेष म्हणजे गंभीर जख्मीना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आल्यावर तिथेही या गटाने राडा करण्याचा प्रयत्न करुन पोलिस,डॉक्टर यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी 15 जणांवर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुस-या गटानेही पूजा कौर यांच्या नातलगांची तक्रार केली आहे. स्कॉर्पिओ गाडी मच्छी मार्केट मधून जात असताना गाडी थांबवून गाडीचे नुकसान करण्यात आले.असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या दोन्ही गटाच्या दंगलीत 11 जण जख्मी झाले असून अटकसत्र सुरु असल्याची माहिती हिल लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन वाघमारे यांनी दिली.

Related posts

आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नाण्यांचे १ दिवसीय अनोखे प्रदर्शन

News Desk

हिंदी आणि भारतीय भाषा वाचवणार, प्रकाश जावडेकरांचे आश्वासन

News Desk

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk