HW News Marathi
महाराष्ट्र

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे प्रकाशित समग्र साहित्य खंड अपुरे   

उत्तम बाबळे नांदेड :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांसह आदींच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, निवडक वाड्•मय (समग्र साहित्य खंड) खंड -१ आणि २ चे नुकतेच प्रकाशन राभवन मुंबई येथे झाले.खंड – ३ हा प्रकाशनासाठी तयार असून एकूण ७ खंड प्रकाशित होणार आहेत.राज्य शासन व समिती यांनी केलेली कामगीरी ही अभिनंदनीय आहे.परंतू राज्यातील अण्णाभाऊ साठे प्रेमी वाचक, त्यांच्या विचाराचे अनुयायी यांची संख्या पाहता प्रकाशित खंडाच्या प्रतिंची संख्या ही अतिशय अपुरी असून ते समग्र खंड या वाचक व अनुयायी यांच्यापर्यंत योग्य रित्या पोहचविण्याची जबाबदारी आता सामाजिक संघटना आणि सामाजिक जान,भान असणा-या कार्यकर्त्यांनी पेलावी लागेल.तरच हे साहित्य योग्यरित्या योग्य त्या व्यक्तींना वाचण्यास मिळेल. देश स्वातंत्र्य,संयुक्त महाराष्ट्र,मराठवाडा मुक्ती संग्राम,गोवा मुक्ती संग्राम यासह मानव मुक्तीच्या महत्वपुर्ण लढ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या झुंजार लेखनीतून लिहल्या गेेलेले साहित्य हे विश्व साहित्य पटलावर प्रभावी व अतुलनिय उमटलेले आहे.या महान प्रतिभावंताचे समग्र साहित्य एकत्रीत मिळणे कठीण होते.परंतू महायुती सरकारने व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीने हे साहित्य समग्र खंड रुपात उपलब्ध करुन दिले आहे.त्याबद्दल राज्य शासन व समिती ही अभिनंदनास पात्र आहे.एक उणीव अशी की,समितीने घेतलेल्या ठरावानूसार ५० हजार खंड प्रकाशित झाले असते तर सबंध महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे साहित्य प्रेमी वाचक,अनुयायी व समाज यांच्या पर्यंत हे खंड काही प्रमाणात पोहचले असते.परंतू या प्रकाशित खंडाची संख्या ही अत्यल्प असून यावर्षी केवळ १० हजार प्रती व दुस-या वर्षी १० हजार प्रती उपलब्ध केल्या जाणार आहेत.१ मे रोजी केवळ १ हजार प्रतीच प्रकाशित झाल्या.दुस-या टप्प्यात १८ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनी ४ व १ आॅगस्ट रोजी जयंती दिनी ५ हजार ,अशा एकूण १० हजार प्रतीच यावर्षी प्रकाशित होणार आहेत.ही संख्या अगदी अपुरी आहे.राज्याच्या जिल्ह्यांची व्याप्ती पाहता प्रकाशित झालेले खंड जर जिल्हा निहाय समान वितरीत करण्यात आले तर प्रती जिल्हा केवळ २८ ते ३० खंड उपलब्ध होतील.दुस-या टप्प्यात प्रकाशित होणारी संख्या पाहता केवळ ११० ते ११४ खंड आणि तिस-या टप्प्यात प्रकाशित होणारी संख्या पाहता १३५ ते १४५ खंड उपलब्ध होतील.म्हणून हे खंड खरे वाचक,अनुयायी व समाज यांच्या पर्यंत पोहचणे थोडे कठीणच वाटत आहे.कारण सर्वांना परवडणारी किंमत असल्याने खरेदी पण झपाट्याने होणार आहे. हे होत असतांना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व विचारांचे विरोधक हे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करुन भूमीगत करण्याची शक्यता दिसत आहे.शासन व समितीने आपली जबाबदारी पार पाडली आहे.परंतू हे साहित्य दाबल्या जाऊ नये व ख-या वाचक,अनुयायींना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आता खरी जबाबदारी सामाजिक संघटना,नेते,अनुयायी समाज आणि कार्यकर्त्यांवर येऊन पडली आहे.प्रत्येक जिल्ह्यातील या जबाबदार घटकांनी काळजी घेऊन जास्तीत जास्त हे खंड योग्य त्या व्यक्तींपर्यंत कसे पोहचतील याची काळजी घेतली पाहिजे.खंड उपलब्ध करुन दिले पाहिजेत.आणि ही जबाबदारी सर्वांना पेलावीच लागेल अन्यथा खरे वाचक,अनुयायी व समाज या साहित्त्या पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.तर मग चला ही जबाबदारी सर्व मिळून पेलूया व शासनास विनंती करुया की याच वर्षी किमान ५० हजार प्रती या प्रकाशित खंड – १ आणि -२ च्या उपलब्ध करुन द्याव्यात.तरच अण्णाभाऊ साठे व त्यांचे प्रतिभाशाली विशाल साहित्य गावपातळीवर पोहचेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! – अब्दुल सत्तार

Aprna

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या !

News Desk