HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची जहरी टीका

सिंधुदुर्ग। शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

दिवंगत भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर चर्चा सुरू होत्या. त्यावरून आता शिवसेनेने भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगताना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

पंकजाचे पंख छाटून टाकले !

OBC आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधार, पाठिंबा म्हणून मुंडे परिवाराकडे पाहिलं जातं. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर एकनाथराव खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलं आहे, असा सणसणीत आरोपही त्यांनी केला आहे.

पुरवठा केल्यानेच भाजपला मंत्रिपदासाठी चेहरे मिळाले !

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही पुरवठा केल्यानेच भाजपला मंत्रिपदासाठी चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे. त्यामुळे त्यांनी आमचे आभारच मानले पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टोलेबाजी केली. एकमात्र भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा राऊत यांनी काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, त्यांनी राग मानून घेऊ नये – जयंत पाटील  

News Desk

किनगाव येथील अपघाताची केंद्र आणि राज्य सरकारकडून दखल, मृत आणि जखमींना जाहीर केली आर्थिक मदत

News Desk

‘या’ सदस्यांचं होते विधानपरिषदेचं शेवटचं अधिवेशन

Aprna