HW News Marathi
महाराष्ट्र

खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण, वरूनराजा बरसण्याची प्रतीक्षा दादा भुसेंची माहिती!

मुंबई। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असल्याची माहिती दिली. अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर पीक पेरणी व पीक वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

जुलैपर्यंत राज्यात ३६८ मिमी पाऊस-

राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली असून कोकण विभागात मुसळधार पाऊस होत आहे. औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. १२ जुलैपर्यंत राज्यात ३६८ मिमी. पाऊस झाला

खरिपाचं १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्र

राज्यात ऊस पिकासह खरीपाचे क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापासून पर्जन्यमानास सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरु झाली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.राज्यात अद्यापही काही भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून खरीपाशी निगडीत कामांबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

कोकण विभागात खरीपाचे ४.४२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ०.९८ लाख हेक्टर (२२.१७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात २१.१९ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी ११.२६ लाख हेक्टर (५३.१२) टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात ८.६७ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून आतापर्यंत ६. ४१लाख हेक्टर (७३. ९९ टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीपाचे क्षेत्र ८.०३ लाख हेक्टर असून ६.७३ लाख हेक्टर (८३.७७टक्के) पेरणी झाली आहे.औरंगाबाद विभागात २०.२३ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी १७.५२ लाख हेक्टर (८६.६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

लातूर विभागात खरीपाचे क्षेत्र २७.९४ लाख हेक्टर असून त्यापैकी २४.९८ लाख हेक्टर (८६.९०टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ३२.२४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २६.२९ लाख हेक्टर (८१.५५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागात १९.२६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ११ २९ लाख हेक्टर (५८. ६५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी – अतुल भातखळकर 

News Desk

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण !

News Desk

Jay Ajit Pawar Exclusive : युवकांच्या मदतीसाठी राजकारणात येईन !

News Desk