HW News Marathi
महाराष्ट्र

‘सर्वपक्षीय बैठकीला मोदींची केवळ तीन मिनिटे हजेरी,’ विरोधक आक्रमक!

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१९ जुलै) सुरु होणार आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची परंपरा आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ तीन मिनिटांसाठीच हजर राहिल्याने विरोधकांचा तीळपापड उडाला. पंतप्रधानांच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहिल्याबद्दल बैठकीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार डेरेक ओब्रायन यांनी मोदींसमोरच नाराजी व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीला सुरुवातीपासूनच उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, पंतप्रधानांनी हा पायंडा मोडला, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.

या सर्वपक्षीय बैठकीला ३३ पक्षांचे ४० नेते सहभागी झाले होते. यावेळी अनेक नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ले दिले. तसेच काही सूचनाही केल्या. बहुतेक सदस्यांनी कृषी कायद्यावरून सरकारला अनेक सूचना केल्याचं सूत्रांनी समजतंय. उद्या १९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात तीन अध्यादेशांसहीत २३ विधेयक मंजूर करण्यात येणार आहेत. त्यात १७ नवे विधेयक आहेत.

यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा विषय हा अतिशय महत्वाचा असून केंद्र सरकारकडून याबाबत कसलीच ग्वाही आणि समाधान त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. देशातील कोरोना संकटाची परिस्थिती, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि वाढती महागाई या विषयांवर आपल्याला चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्यांपासून पळ काढू नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केली.

दरम्यान, या बैठकीत सरकार प्रत्येक मुद्दयांवर चर्चा करायला तयार असल्याचं मोदींनी स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून समजतंय. मात्र तरीदेखील या बैठकीत अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाहीये आणि याचमुळे पंतप्रधान फक्त औपचारिकतेकरिता उपस्थित होते का असा सवाल उठवला जातोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे मुंबईच्या महत्त्वास कोणतीही बाधा येणार नाही

News Desk

मुख्यमंत्री निधी देताना कोणतीच काटकसर करत नाहीत, अब्दुल सत्तारांचा चव्हाणांना पलटवार

News Desk

“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं”, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप   

News Desk