HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनींचं नुकसान, ८१ टक्के पंचनामे पूर्ण विजय वडेट्टीवार यांची माहिती!

मुंबई। मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून जमीनी देखील नापीक झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. आतापर्यांत ८१ टक्के पंचनामे झाले असून अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान झाले असल्याचा माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. गुलाब चक्रीवादाळामुळे पंचनामे पुन्हा केल्यास २२ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान झाले असल्याची शक्यता वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जिवीतहानी झाली आहे. राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येईले असे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मराठवाड्यात १८० टक्के पाऊस पडल्याची नोंद

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतीचे नुकसान झाल आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जनावर वाहून आणि मृत्यू पडण्याच्या घटना झाल्या आहेत. पहिल्या दिवशी वादळ यामुळे राज्यात आतापर्यंत ४३६ लोकांचा जीव गमवावा लागला आहे. पुरात वाहून जाणे आणि दरडीखाली त्यांचा मृत्यू होणे अशा प्रकारचे विशेष वीज पडून मोठ्याप्रमाणात मृत्यू झाले आहेत. १९६ मृत्यू केवळ वीज पडल्यामुळे झाले आहेत. हा पाऊस ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी १०० ते १५० मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात १८० टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १० पैकी ७ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. ४३६ पैकी ६ मृतदेह सापडले नाहीत. तर ४३१ लोकं जखमी झाले आहेत अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

२२ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान झालं

लातूर नंदुरबार, उस्मानाबादल जळगावमध्ये मदतीसाठी एनडीआरएफ पथक पाठवण्यात आले आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना रेस्क्यू करण्यात आले. जळगावला एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. विशेष करुन २६ लोक जखमी झाले आहेत. ९७ जनावरांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला आहे. कच्चा घरांची पडझड झाली आहे. १७ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान सरासरी ८१ ट्कके पंचनामे झाले आहेत. संततधार पावसामुळे पंचानम्यांमध्ये अडचणी आल्या सध्या १९ टक्के पंचनामे उर्वरित आहेत. गुलाब चक्रीवादळाची माहिती अद्याप येत आहेत. पुन्हा पंचनामे करण्यात येतील यामध्ये २२ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान झालं आहे. प्रचंड मोठं नुकसान आहे.

केंद्र सरकारला बऱ्याच वेळा मदतीसाठी पत्र पाठवले आहे. त्यांना जवळपास सरकार आल्यानंतर १९ डिसेंबर २०१९ मध्ये पत्र पाठवले होते. ९३ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले होते विनंती केली होती. निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी १ हजार ६५ कोटी रुपये मिळावेत अशी विनंती करण्यात आली होती. त्यातून २६८ कोटी ५९ लाख रुपये पाठवण्यात आले. पुर्व विदर्भातील पुरपरिस्थितीसाठी दोन प्रकारचे प्रस्ताव पाठवले होते. पहिला ८१४ आणि दुसरा ९९९ कोटींचा यातील दुसऱ्या प्रस्तावाचे १५१ कोटी ५३ लाख रुपये प्राप्त झाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले तर आम्हाला आनंद होईल !

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

News Desk

औरंगाबादमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह, शहराची संख्या २० वर

News Desk