HW News Marathi
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1800 कोटींचे नुकसान, मंत्री अशोक चव्हाणांची माहिती!

मुंबई। राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली.

समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

“राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”

प्राथमिक हानीचा अंदाज

“अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

कुठलेही संकट आले तरी आम्ही एकत्र राहणार !

News Desk

“राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ती प्रेस गांजा ओढून घेतली होती का?”, लसीकरणावरुन गोपीचंद पडळकरांचा सवाल

News Desk