HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात दिवसभरात ६ हजार ३८४ जण करोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू!

मुंबई। राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही रोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होणाऱ्यांपेक्षा कमी आढळून येत आहे, शिवाय रोज मोठ्याप्रमाणावर रूग्ण देखील कोरोनातून बरे होत आहेत. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३८४ रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर ४ हजार ३६५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १०५ कोरोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

आत्तापर्यंतची रुग्णसंख्या

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१९,२१,७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,१५,९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,२२,२२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५५,४५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सामील झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांवर नितेश राणेंची टीका

Aprna

‘रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय नाही’, विजय वडेट्टीवारांची माहिती

News Desk

अर्णब गोस्वामी यांना यूके’च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला

News Desk