HW News Marathi
महाराष्ट्र

मौजमजा करण्यासाठी ते शाळा चुकवून पळाले

नाशिक: रोज शाळेत जाऊन अभ्यास घोकत बसण्याला कंटाळलेल्या नववीतील चार विद्याथ्र्यांनी घरच्यांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची घटना जिल्ह्यातील दिंडोरी भागात घडली. शाळेत जातो सांगून त्यांनी गुरुवारी सकाळी धूम ठोकली आणि थेट गुजरात सीमेवरील सापूतारा हे थंड हवेचे ठिकाण गाठले.

दरम्यान, शाळा सुटल्यावरही ते न परतल्याने घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक (मविप्र) जनता इंग्लिश स्कूलमधील इयत्ता नववीत शिकणारे हे विद्यार्थी आहेत. यातील दीपक कडाळे आणि जीवन बल्हाळ हे दोघे दिंडोरी येथे, तर अमोल सुदाम चौधरी तळेगावात आणि कुलदीप सुनिल देशमुख ओझरखेड येथे राहतात. सुदैवाने गुरुवारी रात्री उशिरा ते घरी परत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

गुरुवारीसकाळी अकराच्या सुमारास ते शाळेत जाण्यासाठी घरून निघाले, मात्र शाळेत न जाता ते सापुतारा येथे फिरण्यास गेले. संध्याकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतरही ते घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. राञी उशीरा दिंडोरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक सापूताराला रवाना झाले. सुदैवाने दिवसभर सापुतारा येथे पर्यटन करून चौघेरात्री एक वाजता घरी पोहोचले. सापुतारा येथे फिरायला जाऊ व पाच वाजेपर्यंत परत येऊ असा त्यांच्या अंदाज होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी होणार

News Desk

शाळेत गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी शाळांचा दर्जा कसा उंचावला?, शिक्षणाधिकाऱ्यांचा आरोप

News Desk

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk
क्राइम

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

मुंबई- अंत्यत वादग्रस्त ठरलेल्या झोपु योजनेसाठी बिल्डर कोणत्या थराला जावू शकतात, याचा भंडाफोड संदीप येवले या तरुणाने केला. बिल्डरांकडून मिळालेली ४० लाखांची रोकड त्याने पत्रकार व कॅमेरासमोर आणून बिल्डरला तोंडघशी पाडले. हा सर्व प्रकार गैरव्यवहार उघड करू नये, म्हणून बिल्डरांनी केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीत अनेक बड्या अधिकारी व नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बिल्डरांने आपल्याला ११ कोटी देण्याचे कबुल केले होते. त्यातील 40 लाखांची लाच दिल्याचे सामाजिक कार्यकर्ता संदीप याने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून देण्याच्या बदल्यात बिल्डरांना प्रकल्प क्षेत्रावर वाढीव चटई क्षेत्र (एसएफआय) दिला जातो. राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुंबईतील एसआरए योजना अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आहेत. विक्रोळी पार्कसाइट येथील हनुमाननगर येथे एसआरए प्रकल्प चालू आहे. त्यासंदर्भात संदीप येवले याने माहिती अधिकारात (आरटीआय) सर्व माहिती जमा केली. ती माहिती प्रसिद्धी माध्यमांकडे देऊ नये यासाठी बिल्डराने संदीप येवले यांना एक कोटी रुपये देण्याचे मान्य केले.

Related posts

लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने | एसआयटी कर्नाटक

Gauri Tilekar

मुलापाठोपाठ पित्याचीही आत्महत्या

News Desk

नांदेड येथे गाेदावरी नदी काठी तरुणाचा खून

News Desk