HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात एकाच दिवसात ८,८६० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. एक अत्यंत दिलासादायक बाब अशी कि, राज्यात आज (३० जुलै) तब्बल ८,८६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही २ लाख ४८ हजार ६१५ इतकी झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ६०.३७ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, राज्यात आज ११,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ७९८ इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत कोरोनावर उपचार घेणाऱ्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार १५० इतकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक, नांदेड, परभणीत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk

बिल गेट्स यांनी पत्रातून भारताबद्दलची भावना व्यक्त केली

News Desk

“महाराष्ट्र सरकारमुळे देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला बसला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारलं

News Desk