HW News Marathi
महाराष्ट्र

ठरलं! राज्यात ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार

मुंबई | राज्यातील शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांनी पडला होता. त्याचाच अखेर मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांची शाळा नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

९वी ते १२वीचे विद्यार्थी वयाने थोडे मोठे असतात, त्यामुळे हे पहिले पाऊल आपण उचलत आहोत. सर्व माहिती घेऊनच आपण शाळा सुरु करु, अधिवेशनात जशा आमदारांच्या तपासण्या केल्या गेल्या, तशा विद्यार्थ्यांच्या करता येतील का, याबाबत चाचपणी सुरु आहे. बाधित शिक्षक शाळेत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. धोरण ठरवून नोव्हेंबरपासून शाळा सुरु करु, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प! – चंद्रकांत पाटील

Aprna

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २०० कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Aprna

“कुणाचाही आधार घेईन, पण एक रासपचा पंतप्रधान नक्की होईन”, महादेव जानकरांची गर्जना

News Desk