HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे ? की एका बबड्याच्या फायद्याचं?”

मुंबई । “हे कायद्याचं राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचं?”, असा सवाल उपस्थित करत भाजप आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच पेटले. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली.

“महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही”, अशा कठोर शब्दात संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आशिष शेलारांनी हा टोला लगावला आहे.

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेवर निशाणा साधताना म्हणतात, “वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण, इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”, असे ट्विट आशिष शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, या प्रकरणी संबंधित ६ आरोपी शिवसैनिकांना जामीन मिळाल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती”,चंद्रशेखर बावनकुळेचं मोठं वक्तव्य

News Desk

अकोला जिल्हात कोरोनाची एन्ट्री, पहिला कोरोना पाझिटिव्ही रुग्ण आढळला

News Desk

दोनो रणजीत है,अटल अभी जीत है

News Desk