HW News Marathi
महाराष्ट्र

रत्नागिरीत आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

मुंबई | महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज (मंगळवार, २९ मार्च) आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आले असून त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. रत्नागिरीतील खारेपाटण येथे हा अपघात घडल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात आदित्य ठाकरे यांना दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत. मात्र दोन-तीन गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

आदित्य ठाकरे हे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले असून यावेळी ते सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लागल्याने मागील कारची समोरील कारला धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारेपाटण चेक पोस्ट जवळच्या परिसरात हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे या गाड्या असताना एका गाडीने ब्रेक मारला त्यामुळे ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या. या अपघातात कोणी जखमी झाले नसून वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व भाजप नेते  नारायण राणे यांचे गृहराज्य असलेल्या मालवणमध्ये बुधवारी ते सभेला संबोधित करणार आहेत. सोमवारी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीन दिवसीय कोकण दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्याने शिवसेनेला आपला बालेकिल्ला कोकण अधिक शक्तिशाली बनवायचा आहे, असे म्हंटले जात आहे. तर शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यावर भाजप आणि राष्ट्रवादीचं लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पवारांबद्दल खालच्या पातळीवर बोला त्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही”, आव्हाडांनी पडळकरांना सुनावलं

News Desk

अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिले दिवाणी अधिकार

News Desk

पंडित नेहरुंचे योगदान नवीन पिढीला माहित व्हावे यासाठी राज्यभर कार्यक्रम राबवणार !- नाना पटोले

News Desk