HW News Marathi
महाराष्ट्र

एटीएसने अटक केलेले आरोपी सनातनचे साधक नाहीत – चेतन राजहंस

मुंबई | महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून मागील काही दिवसांमध्ये काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना अटक झाली. नालासोपारा स्फोटक प्रकरणी सनातन संस्थेवर अनेक आरोप लावले गेले. या प्रकरणी अटक झालेला वैभव राऊत हा सनातनचा साधक असल्याचा आरोप देखील लावला गेला. मात्र आता या संदर्भात सनातन संस्थेने हात झटकले आहेत. एटीएसने अटक केलेले ९ लोक सनातनचे साधक नाहीत, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरण, नालासोपारा प्रकरण या सर्वात आमचा हात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्थेची बदनामी केल्याबद्दल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सनातन संस्थेवर एटीएसने केलेल्या आरोपांवर आज हंसराज यांनी उत्तरे दिली आहेत. सनातन संस्थेकडून जे कार्य करण्यात आले आहे त्यामुळे देशाच्या सुरक्षेला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. तसेच आमच्यामुळे जातीय तेढ निर्माण झाली नाही. संस्थेवर होणारे आरोप हा एक प्रकारचा अन्याय असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण सनातनला लक्ष्य केले जात आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरण, गौरी लंकेश हत्याप्रकरण, नालासोपारा प्रकरण यांच्याशी सनातनच्या साधकांचा संबंध असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. यावर सनातन संस्थेने आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकारला नख लावणे इतके सोप्पे नाही, हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे – संजय राऊत

News Desk

बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून एकलहरे औष्णिक केंद्राचा कायापालट करा! – नितीन राऊत

News Desk

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीच्या रणजित बागलचा पोस्टरद्वारे सवाल!

News Desk