HW News Marathi
Covid-19

अदानी शरद पवारांना जाऊन भेटले अन् …! राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप 

मुंबई । “सरकारमधील वीज मंत्र्यांनी आधी वीजबिल कमी करु असं अश्वासन दिलं. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. महाविकासआघाडी सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे”, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या अवाजवी वीजबिलांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर हे गंभीर आरोप केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते
“वीज कंपन्यांना ना फायदा झाला ना नफा. पण म्हणून जर हे सरकार नागरिकांना पिळणार असेल तर कसं चालेल ? पहिल्यांदा राज्याच्या वीज मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वीजबिल दर कमी करु. मात्र, त्यानंतर शब्द फिरवला घुमजाव झालं. मी राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं. मी शरद पवारांशी बोललो. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली”, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
“राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे मी शरद पवारांशी बोललो. तेव्हा शरद पवार म्हणाले की त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएसईबी असेल किंवा टाटा ज्या कंपन्या असतील त्यांच्याशी शरद पवार बोलणार होते. मात्र, काही दिवसांनी कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले आणि त्यानंतर सरकारने ‘वीजबिल माफ करणार नाही’ अशी भूमिका घेतली. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे”, असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन!

News Desk

शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करणार !

News Desk

सिरमचा ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला

News Desk