HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई | राज्यात १ डिसेंबरपासून इयत्ता पहिले ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परंतु, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू होत्या. शाळांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच राज्यात इयत्ता पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सरसकट सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (२५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ग्रामीण भागात पहिली ते चौथी सुरू होणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरू झाल्या होत्या. तसेच शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने परवानगी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून चाइल्ड टास्क फोर्सची चर्चा सुरू होती. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे गायकवाडांनी सांगितले.

कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून शाळा सुरू करणार आहे. टास्क फोर्सशी चर्चा करून आणखी नियमावली बनवणार आहे. विद्यर्थ्यांना आरोग्यदायी वातावरण देण्याचा प्रयत्न आहे, असे गायकवाड आज पत्रकार परिषदेतून सांगितले. येत्या आठ दिवसांमध्ये शाळा नियमावली बनवणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”, राऊतांनी मोदींना टोचलं

News Desk

प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशनाला राज ठाकरेंनाही बोलवा! आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

जयकुमार गोरे हटावण्याची माण- खटावमधील सर्वपक्षीयांची मागणी 

News Desk