HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उद्याऐवजी सोमवारपासून दुकान सुरू करण्याचा निर्णय

मुंबई | राज्यातील सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मिशन ‘ब्रेक द चेन’ला सुरुवात केली. मात्र, यामार्फत घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी आणि दुकानदार हैराण झाले. या निर्बंधांअंतर्गत राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने देखील बंद करण्यात आली. या निर्णयाविरोधात राज्यातील संतप्त व्यापाऱ्यांनी आंदोलन करून उद्या म्हणजेच ९ एप्रिलपासून दुकाने उघडण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी आपला निर्णय बदलला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत व्यापाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी या व्यापाऱ्यांकडे २ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्याचप्रमाणे, सरकार सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी उद्या म्हणजे ९ एप्रिलला दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय स्थगित केला आहे. त्याचप्रमाणे येत्या सोमवारपासून म्हणजेच १२ एप्रिल सर्व व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव या बैठकीत एकत्रितपणे संमत झाला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड ॲग्रिकल्चर तर्फे आज याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची ऑनलाईन मिटिंग झाल्याची माहिती मिळते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन

News Desk

विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकसाघाडीची बैठक

swarit

चंद्रकात पाटलांचा रात्रीवरच जास्त भरोसा !  जयंत पाटलांनी डिवचले

News Desk