HW News Marathi
महाराष्ट्र

अफजलखानाने देखील अस्तित्वाची भीती दाखवून शरण येण्यास प्रवृत्त केले होते !

पुणे | “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर देखील संकट आले होते. अफजलखानसारखा बलाढ्य विध्वंसक राज्यावर चालून येत होता. अनेकांना अस्तित्वाची भीती दाखवून शरण येण्यास प्रवृत्त करत होता. मात्र, महाराज डगमगले नाही. उलट त्यांनी त्याला हरवण्याची संधी शोधली”, असे म्हणत राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पक्षांतर करणाऱ्या आमदार, पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात आयोजित ‘युवासंवाद’ कार्यक्रमात बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुक अगदी तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक नेतेमंडळी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, येत्या विधानसभेत राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान सध्या राष्ट्रवादीपुढे आहे. याच पार्श्वभूमीवर आता, राष्ट्रवादीने राज्यात पक्षाला बळकट करण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सोपविली आहे. त्यासाठी आता अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढणार आहे. येत्या ६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीच्या या ‘शिवस्वराज्य यात्रे’ला सुरुवात होईल.

आगामी विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. येत्या विधानसभेच्या प्रचारात आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने काम करतील असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून अनलॉक-६ च्या गाईडलाईन्स जारी

News Desk

“ही केमिकल लोचाची केस,” उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Aprna

“उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार”, प्रदीप शर्मांवरुन सोमय्यांची टीका

News Desk