HW News Marathi
महाराष्ट्र

आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा – अजित पवार

पालघर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यसाठी ओळखले जातात. एखादी वास्तू, प्रकल्प, योजना या लोकांच्या श्रमाच्या, घामाच्या पैशांतून उभ्या राहत असतात. आपल्याला मिळतो तो पगारही जनतेच्या पैशांतून दिला जात असल्याची जाणीव आमच्यासह सर्वांनी ठेवून जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

विकासाच्या धर्तीवर बळ देण्याचे काम महाविकास आघाडी करेल

पालघर हा नवनिर्मित तरुण जिल्हा असून, या जिल्ह्याला विकासाच्या धर्तीवर बळ देण्याचे काम महाविकास आघाडी करेल. देशात पालघर जिल्हा सर्वोत्तम जिल्हा असल्याचे आपल्या कामातून दाखवून देऊ या, असे सांगून आपला पालघर जिल्हा विविधतेने नटलेला संपन्न जिल्हा असल्याने आपण एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

सिडकोने मुख्यालयाच्या इमारतीची रचना केली आहे

संपूर्ण देशात एक रोल मॉडेल ठरेल अशा, १०३ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर, जव्हारच्या मुकणे महाराज संस्थानच्या जयविलास पॅलेसच्या धर्तीवर सिडकोने मुख्यालयाच्या इमारतीची रचना केली आहे. – ही वास्तू उभारण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी या निर्जीव वास्तूला आपल्या कार्यातून जिवंतपणा आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. – पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात रोल मॉडेल ठरेल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस म्हणतात, शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे !

News Desk

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच उमेदवारांची नावे

Aprna

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

Manasi Devkar