HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेमुळे पालिका निवडणुकीसाठी भाजप सतर्क

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांना वाजत पक्षात घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. पवार यांच्या भूमिकेमुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या गोटात मात्र पुन्हा एकदा कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी १९ नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांसह महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी न बदलण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये याकरिता भाजप अधिक सतर्क झाली आहे.

स्थायी समितीच्या ८ सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. यावेळी अध्यक्ष कोण असणार याबद्दल सुरुवातीला असलेली उत्सुकता शमली आहे. कारण विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. सभागृह नेते बदलानंतर महापौर बदलाची चर्चा सुरु झाली होती. महापौरपदावर नवा चेहरा हवा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. परंतु, महापौरही बदलणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट केले आहे.

पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, योगेश मुळीक, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे यांना प्रमुख पदांवर संधी मिळाली. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत काही नगरसेवक खासगीत व्यक्त करीत आहेत. यंदा काही उपनगरांसह सिंहगड रस्ता परिसराला प्रतिनिधित्व मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. त्यादृष्टीने श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, शंकर पवार यांनी तयारी चालविली होती. सातारा रस्त्यावरील धनकवडीतील नगरसेविका वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर हे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांच्या विरोधात अश्लिल पोस्ट टाकणाऱ्या एकास अटक, दुसरा पसार

News Desk

‘गुन्ह्यांवरून एखाद्या समाजाला टार्गेट करणे योग्य नाही’, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

उल्हासनगरात नागरिकांच्या तक्रारी निवारणाचा मार्ग झाला सोपा

News Desk