HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी निर्णय घेतले, तर बिघडले कुठे?

मुंबई | ७ आणि ८ सप्टेंबरला विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले. यावेळी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात अनेक विषयावरून वादावादी झाली. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत बसून निर्णय घेतात, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां शासकीय निवासस्थानी निर्णय घेतले, तर बिघडले कुठे, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला विधानपरिषदेत केला.पुरवणी मागण्यांवर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांचे चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यातील प्रत्येक विभागाकडे बारीक लक्ष आहे. पंतप्रधानांप्रमाणे ते प्रत्येक विभागातील अधिकारी व संबंधितांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बोलून निर्णय घेत आहेत. कोरोनाचा मुकाबला राज्य सरकार समर्थपणे करीत आहे. केंद्राकडून राज्याच्या हिश्श्याचे २२ हजार कोटी रूपये मिळालेले नाहीत. तरीही राज्य सरकार आपल्या निधीतून मोठी आर्थिक मदत देत आहे. जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३२४४ कोटी रूपयांचा निधी मंगळवारीच वितरीत केला असून त्यापैकी ५० टक्के करोनासाठी आहे. केंद्र सरकार आता पीपीई किट, औषधे आदींसाठी निधी देणार नाही, तो भार राज्य सरकार उचलणार आहे. राज्याने गरजूंना अन्नधान्य व इतर मदत केली आहे.जनतेच्या मदतीसाठी गरज लागेल तेवढा निधी उभारू, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तर.. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना विचारायला हवं”, सुधीर मुनगंटीवाराचं परिवहन मंत्र्यांना उत्तर

News Desk

पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू, चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

News Desk

महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील! – देवेंद्र फडणवीस

Aprna