HW News Marathi
महाराष्ट्र

“जर आम्ही घाबरलो असतो तर…”, अजित पवारांचे फडणवीसांना उत्तर

पुणे | विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला कुणीही घाबरत नाही, ज्यावेळेस एखाद्याला सरकार चालवायचं असतं, त्यावेळेस कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असावी लागते. निवडीला जर आम्ही घाबरलो असतो तर मग विधानसभा अध्यक्षांचा राजीनामाच आम्ही होऊ दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटून नाना पटोलेंनी तिथं राजीनामा दिला. अगोदर त्यांच्या हायकमांडने सांगितलं व नंतर महाविकासआघाडीचे सदस्य म्हणून आम्हा लोकांना ते भेटले आणि मग राजीनामा दिला.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलाताना स्पष्ट केलं.

तसेच, “तुम्हाला आठवत असेल सुरुवतीस सांगितलं गेलं. हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल, नऊ महिने चालेल, बारा महिने चालेल आता सव्वा वर्ष झालं प्रत्येक वेळी तीन-तीन महिने ते वाढवत आहेत. सध्या तरी या सरकारला कुठलाही धोका नाही. सरकार अतिशय व्यवस्थितपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कामकाज करत आहे. तिन्ही पक्ष एकोप्याने काम करत आहेत.

अधूनमधून शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचं मार्गदर्शन मिळत आहे. काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींची देखील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होत असते आणि त्यांनी जर बैठक घेतली तर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्वजण मंत्रिमंडळात असतात सर्वजण चर्चा विनिमय करून सरकार चालवण्याचं काम करत आहेत. सरकारला काही अडचण नाही.” असं सांगताना अजित पवारांनी भाजपा नेत्यांना टोला लगावल्याचेही दिसून आले.

यावेळी अजित पवार म्हणाले, “आज जवळपास १७० आमदारांचं पाठबळ आहे आणि भविष्यात अधिवेशनाला देखील आम्ही सामोरं जाणार आहोत. त्यावेळेस एखादं बिल असताना (मनी बिल) त्यात जर कुठं मतदानावेळी सरकारची संख्या कमी झाली, तर सरकार त्या ठिकाणी राहत नाही असं होऊच शकत नाही, आज स्पष्ट बहुमत आहे.”

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

विधानसभेत बहुमत असतानाही आपल्याच आमदारांवर सरकारचा विश्वास नाही. असे घाबरट सरकार आतापर्यंत पाहिले नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही”, देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

News Desk

राष्ट्रवादीत आणखी एका मोठ्या नेत्याची एन्ट्री!

News Desk

संघ बदलाकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान

News Desk