HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोलेंनी कोणतीही विधानं केली तरी आघाडीला धोका नाही – अजित पवार

पुणे | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देतानाच, आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचे खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर आता आघाडीत बिघाडी होणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य करत नाना पटोले काहीही बोलले तरी महाविकासआघाडी सरकारला धोका नाही, असं म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन त्यांना चिमटा काढला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१६ जुलै) पुण्यात बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत धुसपुस सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पटोलेंच्या वक्तव्यामुळे आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र, यानंतर या सर्व प्रकरणाची स्पष्टता जनतेला देण्यासाठी शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंसारख्या लहान माणसांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असे शरद पवार यांनी थेट सुनावल्याने थेट सुनावल्याने महाविकास आघाडीतील संबंधांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले. याला थेट प्रतिउत्तर म्हणून पटोले यांनी शरद पवार हे ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याची टीकाही केली.

या सगळ्या गोष्टींनंतर आघाडीत बिघाडी होतो की काय असे वातावरण तयार होत असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. पटोले यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत पटोले यांना टोला हाणला. आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही, असे पटेल यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी भाष्य केले आहे. या पुढे नाना पटोले यांच्या वक्तव्याला महत्व द्यायचे नाही, असेच संकेत अजित पवार यांनी आपल्या आजच्या वक्तव्यातून दिले आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकटे पडतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”

News Desk

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

Aprna

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा बांलणीवर

News Desk