HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे २ व्हायरस लोकांवर कधीही ग्रासतील –  अमृता फडणवीस

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नाही, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही, कुठे, कसे ग्रासतील हे सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून आपला बचाव करा.. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!

 

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. या अटकेनंतर आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. पावरलेस मुख्यमंत्री असं समित ठक्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. यामुळे समितला अटक केली का? असा प्रश्न आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत विचारला. आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘पेंग्विन महा सरकार विषाणू’ म्हणत शिवसेनेवर निशाना साधला आहे.

समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज (२४ ऑक्टोबर) अटक केली आहे. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधी अंतर दिले नाही – सुप्रिया सुळे

News Desk

खानदेशात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

News Desk

अजित पवार पोहोचले कोल्हापूरात, शिरोळमध्ये पाहणी करत व्यापाऱ्यांशी केली चर्चा

News Desk