HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार विरोधी आंदोलनाचा राजू शेट्टीना मोठा फटका!

मुंबई। राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नेमणुकीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी भेट घेतली. पण या भेटीनंतर राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच 12 आमदारांच्या यादीतून आता नाव वगळण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी सरकार विरोधात वेळोवेळी आंदोलने केली आहेत म्हणूनच हे नाव आता राष्ट्रवादीच्या यादीतून वगळण्यात आल आहे. सरकार विरोधी आंदोलन राजू शेट्टींचा असल्यामुळे हा मोठा फटका त्यांना बसला आहे. मात्र या आधी राजू शेट्टी यांनी संपुर्ण नेमणुकांच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली आहे. मला यात फारसा रस राहिलेला नाही, तसेच मी याबाबतचा पाठपुरावाही केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारा आमदारांच्या यादीतून राजू शेट्टीं यांचं नाव कट

कदाचित ईडी आणि इनकम टॅक्सची धाड न पडल्यानेच मला संधी दिली नसावी असे राजू शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडीने कॅबिनेट निर्णयाद्वारे पाठवलेल्या यादीतून राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतरच माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मात्र आता राष्ट्रवादीची 12 आमदारांची यादी जाहीर झाली आहे त्यातून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले आहे. मी कोणताही दरोडा घातलेला नाही. माझ्यावर ईडीची कारवाई होत नाही. इतर कोणतीही कारवाई त्यांना करता येत नाही. जनतेच्या प्रश्नावर माझ्यावर गुन्हे दाखल झाल्याचा मला अभिमान आहे.

आमदारकीच्या नेमणुकीबाबत कधीच पाठपुरावा केला नाही

जनतेच्या प्रश्नासाठी असलेल्या गुन्ह्याची मला लाज वाटत नाही. त्यामुळे राज्यपालांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी या संपुर्ण नेमणुकीच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी या आमदारकीच्या नेमणुकीबाबत कधीच पाठपुरावा केला नाही. आपल्याला यात फारसा रस राहिलेला नाही. त्यामुळे आमदारकीच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या निर्णयाने काहीही फरक पडत नाही, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk

पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होईपर्यंत पालकांकडून फी मागू नये

swarit

साताऱ्यात ‘नारळफोड्या गॅंग’; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

News Desk