HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्राचं वाटोळं आता…”, अंजली दमानियांची खोचक प्रतिक्रिया!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या (१७ जुलै) भेटीमुळे राजकीय खलबतं सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या भेटीमध्ये तब्बल तासभर या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणत्या बाबींवर चर्चा झाली, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सहकार क्षेत्राविषयी ही भेट झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जरी सांगितलं असलं, तरी त्यावर राजकीय विश्लेषक आणि इतरांचा विश्वास बसलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भेटीसंदर्भात ट्वीट करून खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या दमानिया?

जिथे भाजप शिवसेना युती चर्चेत होती तिथेच आता राष्ट्रवादी भाजप युतीची चर्चा रंगत आहे. या भेटीवरून अंजली दमानिया यांनी एक विधान केलं आहे. अंजली दमानिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “१५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”.

शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज (१७ जुलै) पंतप्रधान कार्यालयात भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यामुळे त्या लोकांना सोडून देण्यात आले- एनसीबी

News Desk

महाविकास आघाडीने ८० दिवसांत जनतेला कसे मुर्ख बनवले याचा प्रस्ताव मांडणार !

swarit

इमानी कोण करतंय हे देशातील लोकांना समजते, नाना पटोलेंची भाजपवर टीका

News Desk