HW News Marathi
महाराष्ट्र

“पाडून दाखवा सरकार” हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?” – शेलारांचा टोला

मुंबई | आघाडी सरकारवर ताशेरे ओढण्याचे काम विरोधी पक्ष आणि नेते करत आहेतच. आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्याने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘”पाडून दाखवा सरकारचे” हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?’ असं म्हणत शेलारांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

“कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील “पाडून दाखवा सरकारकडे”आहे. कोकणातरेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरू आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

“आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. “पाडून दाखवा सरकारचे” हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?” असे देखील शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; पोलिसांकडून लाठीचार्ज

Aprna

नीलम गोऱ्हे यांची मध्यस्ती…निलेश लंकेंच्या अडचणीत वाढ ?

News Desk

कॉंग्रेसची विधान परिषदेची ऑफर उर्मिला मातोंडकरने नाकारली, कॉंग्रेसचा स्फोट

News Desk