HW News Marathi
महाराष्ट्र

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

मुंबई | विनाशकारी रिफायनरी विरोधीसंघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शनिवार 14 एप्रिल रोजी टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदर अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी विरोधात सध्या ही संघर्ष समीती महत्वाच्या नेत्यांची भेट घेत आहे.

यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्ते सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, लोकांची घरे दारे उध्वस्त करून त्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता हा प्रकल्प होणे हे आम्हाला कधीच मान्य होणार नाही. लोकांचे प्रश्न मार्गी लावा आणि मगच पुढचे पाऊल टाका असा सल्ला यावेळी बोलताना चव्हाण यांनी भाजप सरकारला दिला. २० एप्रिल रोजी काँग्रेसचे शिष्ट मंडळ नाणारला जाणार असून प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहे. आंदोलनात लोकांसोबत राहण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्णब गोस्वामी यांची रवानगी तळोजा कारागृहात

News Desk

“आता वस्त्रहरण अटळ आहे!”, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

News Desk

Ruchita Chowdhary
मुंबई

बाबासाहेबांना अनोख अभिवादन

News Desk

मुंबई | देश व राज्यातील वातावरणतसेच जनतेचा सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला भ्रमनिरास याविषयी जनजागृती करण्यासाठी १४ एप्रिल पासून वर्षभर राज्यभरात वोट हमारा ,राज हमारा मतदार जनजागृती तसेच संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात येत असल्याची घोषणा 14 एप्रिल रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीने करण्यात आली .

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम आर्मी महाराष्ट्रच्या वतीने हारफुलांऐवजी एक वही एक पेन अर्पण करून चैत्यभूमी दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली .यावेळी महाराष्ट्र महासचिव सुनील थोरात , सुनील गायकवाड,रणधीर आल्हाट ,अविनाश गायकवाड , नेहाताई शिंदे ,ऍड .रत्नाकर डावरे, सीताराम लव्हांडे, संतोष वाकळे ,प्रितेश चितळे , वर्षाताई कांबळे,विजय कांबळे , दीपक जगदेव,सुनील वाकोडेयांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी आपल्या या अभियानाची घोषणा केली.

राज्य तसेच देशातील मागासवर्गीयांसह सर्वच मतदारांच्या अपेक्षा केंद्र तसेच राज्य सरकारने काही अंशी पूर्ण करण्याच्या अपेक्षा असताना या दोन्ही सरकारकडून जनतेचा अपेक्षभंग झाला असल्याची नाराजी कांबळे यांनी व्यक्त केली . दलित मागासवर्गीय, मुस्लिम , महिला विद्यार्थी या देशात सुरक्षित राहू शकत नाहीत हे ताज्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे , नोक-या नसल्यामुळे सुशिक्षित तरुण भरकटत चालला असून महागाईनेही उच्चांक मोडला आहे .मराठा समाज आरक्षण ,शेतकरी कर्जमाफीच्या केवळ होत असलेल्या घोषणा , मंत्रालयाचे झालेले आत्महत्यालय तसेच सरकारमधील सहकारी पक्षामध्ये देखील नसलेला ताळमेळ यामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली असून यापुढे त्यांच्या एका मताची किंमत काय आहे, आपले एक मत काय करू शकते, भारतीय संविधानाने जनतेला काय अधिकार दिलेले आहेत याविषयी महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका व गावस्तरावर “हमारा वोट, हमारा राज” असे मतदार जनजागृती तसेच संविधान साक्षरता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली.

 

Related posts

सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी – चंद्रकांत पाटील

News Desk

महासभेत नगरसेविका गेम खेळण्यात व्यस्त

News Desk

चुकीचा अर्थ काढणा-यांना साईबाबा सद्दबुध्दी देवो | सुधीर मुनगंटीवार

News Desk