HW News Marathi
महाराष्ट्र

“केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी आपल्या अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करा”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

मुंबई | देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असताना केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल (१९ मार्च) जागतिक निद्रा दिनानिमित्त केंद्रसरकारला ट्वीटच्या माध्यमातून विचारला होता. यावरुन आता भाजपकडून राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांना ट्विट करत उत्तर दिले आहे.

‘राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल’, असा खरमरीत टोला त्यांनी लगावला आहे.

काय केलं होतं जयंत पाटील यांनी ट्विट?

‘शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्यावर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत… तरुण रोज नोकरी गमावत आहेत…दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे…’,अशा प्रश्नांची सरबत्ती जयंत पाटील यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही…

swarit

राज्यपालांना तर भेटलो पण शरद पवारांशीही बोलणार आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशीही… राज ठाकरे!

News Desk

देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख तर राणेंचा उल्लेखच नाही!

News Desk