HW News Marathi
महाराष्ट्र

बाबरी मशीद, राम मंदिर वाद जमीनिसाठी- सुप्रीम कोर्टाचा सर्व राजकीय पक्षांना दणका

नवी दिल्ली | संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून असलेल्या बाबरी मशीद प्रकारणाची गुरूवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. एखाद्या जमीनीच्या वादाप्रमाणे या खटल्याकडे पाहाणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे या मुदयाचे भांडवल करून राजकरण करणाऱ्या नेत्यांना कोर्टाने दणका दिला आहे‌‌, पुढील सुनावणी 14 मार्चला होणार आहे.
राममंदिर आणि बाबरी मशीद वाद देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा आहे.सरन्यायाधीश दीपक मिश्रा,न्यायमूर्ती अशोक भूषण व अब्दुल नजीर यांच्या विशेष न्यायपीठाने सुनावणी केली.यापुढील तारखा निश्चित होणार आहेत.या आधी दोनदा खटल्यासंबंधीच्या 19519 दस्तऐवजांचा अनुवाद न झाल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.आता यापुढे सुनावणी लांबणार नाही,असे गेल्या वेळी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते.
अयोध्या वादावर सर्व पक्षकारांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांच्या अनुवादित प्रती दिल्या आहेत.ते बाजू मांडण्यास सज्ज आहेत.या अंतिम लढाईत राम मंदिराच्या समर्थनार्थ आलेल्या पक्षकारांचे म्हणणे आहे की,अलाहाबाद हायकोर्टाने 90 सुनावण्यांतच निकाल दिला होता.आता सुप्रीम कोर्टात 50 सुनावण्यांतच निकाल देईल.मात्र,बाबरी मशिदीशी संबंधित पक्षकार तसे मानत नाहीत.त्यांच्या मते,खटल्यात कागदपत्रांचा ढीग आहे.त्या सर्वांवर प्रत्येक मुद्द्यावर युक्तिवाद होईल.हिंदू महासभेचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की,हिंदी,उर्दू,पाली,संस्कृत,अरबीसह 7 भाषांत अनुवादित कागदपत्रे जमा झाली आहेत.
विलंब-7 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात वाद प्रलंबित
अयोध्या वाद सुप्रीम कोर्टात 7 वर्षांपासून प्रलंबित आहे.अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालावर 12 पेक्षा जास्त याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या.कोर्टाने सुब्रमण्यम स्वामींना 2016 मध्ये पक्षकार केले.स्वामींनुसार,इस्लामिक देशांत सार्वजनिक स्थळांवरून मशीद हटवली जाऊ शकते.
प्रकरण-3 समान भागांत जमीन वाटण्याचा होता आदेश
वादग्रस्त जमिनीवर कोणाचा हक्क आहे?यावर अलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये निकाल दिला होता.वादग्रस्त जमीन ३ समान भागांत वाटावी;रामलला मूर्तीच्या स्थानी रामलला विराजमान यांना,सीता रसोई व राम चबुतरा निर्मोही आखाड्याला,उर्वरित सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावी,असे म्हटले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

“उन्नत शेती-समृद्ध शेतकरी” उपक्रमासह विविध कामांना जिल्हा अधीक्षक डॉ. मोटे यांनी भेटी 

News Desk

बैठक-बैठक’ खेळण्याचा दमदार खेळ सुरूच – सामना टीका

News Desk
कृषी

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

swarit

औरंगाबाद | पावसाच्या आगमनाबरोबर शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यास सुरुवात करतात. परंतु गेल्या दोन महिन्यात खरीप हंगामात मराठवाड्यात ३५.२ टक्के पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता पेरणीचा हंगाम संपला असून आतापर्यंत ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नाही. बीड जिल्ह्यात गेल्या पंधर दिवसात सर्वाधिक ९३.३५ टक्के पेरणी झाली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्यात आतापर्यंत ३५.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात अधिक पाऊस ४९.२ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. सर्वात कमी पाऊस हा औरंगाबाद जिल्ह्यात २५.५ टक्के पडला आहे.मराठवाड्यातील काही तालुक्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे या भागातील शेकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. तसेच मरावाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. गतवर्षी बोंडअळीमुळे यंदा शेतकऱ्यांनी कपसाची लागवड केली नाही.

Related posts

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

News Desk

शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास विदेश दौ-यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk