HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारणातील वाद कुठे खरे असतात?- बच्चू कडू

नाशिक | राजकारण म्हटलं कि वादविवाद हे आलेच. आता या ​वादांवर विश्वास ठेवायचा कि नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजकारणातले वाद खरे नसतात असं विधान केला. केवळ मीडियाला दाखविण्यापुरता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संर्घष सुरु असतो. वादाच्या चर्चा सगळ्या खोट्या आहेत. राजकीय नेत्यांमध्ये कोणते वाद खरे असतात का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतील संघर्ष हा देखावा

महाविकास आघाडीमध्ये सध्या कुरघोडी सुरु असल्याचं दिसून येतंय. त्यावर बच्चू कडू यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमधील संघर्ष किंवा कुरुबुरीचे चित्र हा केवळ देखावा आहे. हा संघर्ष वरवर दाखविण्यापुरता आहे. त्यात कधी तत्थ्य असते का असा उलट प्रश्न त्यांनी केला. राज्यातील सरकार कोसळेल असे चित्र वारंवार निर्माण केले जात असले, तरीही प्रत्यक्षात हा सगळा देखावा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. सरकार भक्कम आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

अरेस्ट वॉरंटचं नेमकं काय कारण?

महापालिकेत २०१७ मध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे आंदोलन झाले होते. अपंगासाठीच्या ३ टक्के निधी अपंगासाठी खर्च होत नसल्याच्या कारणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान श्री. कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यात त्यांना अटक झाली होती. मात्र या दरम्यान, जामीनदाराचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ४३८ सहाय्यक निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी बढती

News Desk

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”, दरेकरांचं टीकास्त्र

News Desk

परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार ? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार?

News Desk