HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, ह्या ५ कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोठे नेतृत्व बदल केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं.

त्याबरोबरच नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच जणांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष नेमणूक करताना प्रादेशिक संतुलनही सांभाळण्यात आलं आहे. नितीन राऊत, यशोमती ठाकूर हे विदर्भातील नेते आहेत, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर बसवराज पाटील मराठवाड्यातील नेते आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. काँग्रेसला राज्यात केवळ एका जागी विजय मिळाला होता. राज्यातील या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यात पक्षनेतृत्व बदलाची गरज होती त्यामुळे राज्यात काँग्रेसने नव्याने पक्ष बांधणी केल्याचं समजत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, ७ जखमी

News Desk

राज्यात ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने एकाच खळबळ; जाणून घ्या आरोग्य मंत्री काय म्हणाले

Aprna

“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

News Desk