HW News Marathi
महाराष्ट्र

बीड जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले!

बीड | बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान परळी मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रावरच भिडले होते. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. बँकेवर प्रशासन बसवण्याचं सत्ताधारी पक्षाचं कारस्थान आहे, म्हणून आम्ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. चार वाजल्यानंतरही मतदान सुरु असल्याने तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

धनंजय मुंडेंना टोला

“त्यांची सत्ता सीमा ही परळी आहे. त्यांना दोन जागेवर उमेदावर मिळाले नाही. पराभव आणि यश चालत असते. पराभवाला अनेक मोठ-मोठे लोक सामोरे गेले आहेत. पराभवाचा संबंध अब्रूशी लावू नये. ही चुकीची विचारसरणी आहे.” अशा शब्दात पंकजा मुंडेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. nबीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येता येणार नाही म्हणून प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे. जीवनामध्ये मी लढाई नेहमी अकॅडमीक लढते. सत्ताधारी पक्ष लढाईला सामोरे जात नाही. मतदान बोगस केलं जातंय, असा आरोपही पंकजांनी केला आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

“विरोधी पक्षाने मतदानाच्या काही तासाअगोदर माघार घेतली आहे. हा निवडणुकीतला पळपुटेपणा आहे. मतदारांवरच माजी मंत्र्यांचा विश्वास राहिला नाही. कोणी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रक्रियेला फरक पडत नाही. लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवत असून सर्वची सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी होणार”, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकी संदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकाचा मुदडा पाडून लुटला पेट्रोलपंप

News Desk

महाराष्ट्रातील टोलसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुुसे यांच्या बैठकीत झालेले निर्णय 

Sanjay Jog

तुमच्याकडे आरोपी पण आमच्याकडे एक तक्रारदारच गायब! परमबीर सिंहांवरून मुख्यमंत्र्यांचा टोला

News Desk