HW News Marathi
महाराष्ट्र

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात

नाशिक । अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला आज(१ नोंव्हेबर)पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे.मुळा धरणाचे दोन दरवाजे तर निळवंडे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून या दोन्ही धरणातून ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आतापर्यंत झाला आहे. धरणात सलग सात ते आठ दिवस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभाचे मुख्य अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्याची तहान आज अखेर भागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल (३१ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला. अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला ८टीएमसी पाणी मिळणार आहे.त्याचवेळी या निर्णयाला स्थानिकांचा जनतेचा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. पाणी सोडताना कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती ही या पत्राद्वारे करण्यात आली आहे त्यामुळे धरणाच्या प्रवाहित मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफवा पसरवू नका, राजकारण करू नका ! जयंत पाटील यांनी भाजपच्या संबित पात्रांना सुनावले

News Desk

“भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू”, राऊतांचा कन्नडिगांना इशारा

News Desk

नारायण राणेंवर गुन्हा दाखल! मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द बोलण्याने गुन्हा दाखल

News Desk