HW News Marathi
महाराष्ट्र

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात

नाशिक । अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला आज(१ नोंव्हेबर)पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे.मुळा धरणाचे दोन दरवाजे तर निळवंडे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून या दोन्ही धरणातून ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आतापर्यंत झाला आहे. धरणात सलग सात ते आठ दिवस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभाचे मुख्य अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्याची तहान आज अखेर भागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल (३१ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला. अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला ८टीएमसी पाणी मिळणार आहे.त्याचवेळी या निर्णयाला स्थानिकांचा जनतेचा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. पाणी सोडताना कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती ही या पत्राद्वारे करण्यात आली आहे त्यामुळे धरणाच्या प्रवाहित मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गंगापूर साखर कारखाना प्रकरणी भाजप आमदाराच्या अडचणीत पुन्हा वाढ

News Desk

पवार राष्ट्रपतींची भेट घेणार यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

News Desk

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अमृता फडणवीस म्हणतात…

News Desk
राजकारण

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी जमीन हस्तांतरित करा !

Gauri Tilekar

मीरा रोड | “अयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठी सरकारने तेथील जमीन हस्तांतरित करून मंदिराची उभारणी करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी बुधवारी उत्तन येथे मांडली. ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले त्याचप्रमाणे सरकारने भूसंपादन करून राम मंदिराच्या निर्माणासाठी ती जागा सोपविली पाहिजे.

सध्या राम मंदिराच्या मुद्यावर देशभरात राजकारण सुरू आहे. मंदिराला राजकीय आणि धार्मिक स्वरूप देऊ नये, अशा शब्दात वैद्य यांनी शिवसेनाल टोला लगावला आहे. तसेच १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात देशाच्या महाधिवक्ता यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सरकारने विना विलंब राम मंदिराच्या बांधकामाला गती देण्यास मदत करावी, असे देखील वैद्या यावेळी बोलले.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला मीरा-भाईंदर येथील केशव सृष्टी येथे बुधवारी सुरुवात झाली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या बैठकीत विविध राष्ट्रीय मुद्दे, नवीन शिक्षा निती, संघाचे कार्य, योजनांचा आढावा, राज्यांमधील घडामोडी, सद्यस्थिती यावर चर्चा होणार आहे. तसेच बैठकीसाठी ३५० प्रतिनिधी आले आहेत. संघाच्या विस्ताराचा, संघ कुठे कमी आहे, त्या ठिकाणी संघ कसा वाढवायचा, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Related posts

‘सामना’च्या अग्रलेखातील ‘बुरखा बंदी’च्या भूमिकेवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण

News Desk

राज्यातील सत्तांतरावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी; शिंदे गटाचा युक्तीवाद सुरू

Aprna

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna