HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी खडसेंचे कौतुक केले कारण…

जळगाव | भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा पत्र पाठवलं आहे. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही जणांची नावं राज्यपाल नामनिर्देशित जागांवर विधानपरिषदेत नियुक्तीसाठी आघाडी सरकारने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. यावर राज्यपाल काय निर्णय घेतात? याकडे सगळ्याच लक्ष लागलेले आहे. यातच राज्यपाल यांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल सुनील नेवे लिखित ‘जनसेवेचा मानबिंदू’ या पुस्तकाच्या निमित्ताने खडसे यांचं कौतुक करत त्यांना यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विधानपरिषदेवर घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्यासह १२ जणांच्या नावाची शिफारस महा विकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. असे असताना खडसे यांच्या जीवनावर पुस्तकासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खडसे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढविले जात आहे.

जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचं १० सप्टेंबरला प्रकाशन झालं होतं. एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर ऑनलाईन पद्धतीने पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट- IMD

News Desk

‘आधी आंदोलनं करा मग सरकार काम करणार’, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला खोचक टोला

News Desk

मुख्यमंत्र्यांनी ‘या’ नेत्यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन केली हक्कालपट्टी; शिंदे गटात अंतर्गत कलह

Aprna