HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळीयेला भेट देणार, ग्रामस्थांची विचारपूस करणार

मुंबई | रायगडच्या महाड तालुक्यातील पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले.

मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. ग्रामस्थांनी बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करण्याची मागणी केली आहे. तर, तळीये ग्रामस्थांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी तळीयेला भेट दिली होती. आता महाराष्ट्राचे राज्यपाल मंगळवारी तळीयेला जाणार आहेत. तळीयेमध्ये राज्यपाल भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (27 जुलै) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 9.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून महाड जि. रायगड कडे प्रयाण.

सकाळी 10.20 वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 10.25 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे राखीव.

सकाळी 10.35 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून तळीये ता. महाड कडे प्रयाण.

सकाळी 11.00 वा. तळीये, ता.महाड येथे आगमन व दरडग्रस्त भागाची पाहणी.

सकाळी 11.45 वा. तळीये ता. महाड जि. रायगड येथून पिडिलाइट विश्रामगृहाकडे प्रयाण.

दुपारी 12.10 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

दुपारी 12.20 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून महाड एमआयडीसी हेलिपॅड कडे प्रयाण.

दुपारी 12.25 वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे राखीव. दुपारी 12:30 वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथून गुहागर जि.रत्नागिरी कडे प्रयाण करतील.

गेल्या काही दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती.

मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू मृतांना श्रद्धांजली अर्पण करुन रेक्स्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीसारख्या संस्थेचा राजकीय पद्धतीने वापर करणे अयोग्य – रोहित पवार

News Desk

थोर विधीरत्न राम कदमांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरकही कळत नाही!

News Desk

“शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले!” अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

News Desk