HW News Marathi
महाराष्ट्र

“उर्जामंत्र्यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही”, भाई जगतापांची टीका

मुंबई | काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता पुन्हा समोर आला आहे. नागपूर जिल्हाबँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसनेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही असे म्हणत भाई जगताप यांनी महापारेषणच्या कारभारावर टीका केली आहे.

प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही. लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू असे भाई जगताप यांनी म्हटले आहे. महापारेषण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली बीकेसीतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे.

“मंत्रीमहोदयांचे आदेश पाळले जात नसतील आणि प्रशासन इतकं उद्दाम असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी हे आंदोलन त्यांना इशारा आहे,” असे भाई जगताप यांनी म्हटले आहे. “मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा आमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आमचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यांचाही राजीनामा मागू,” असा इशारा भाई जगताप यांनी यावेळी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता

अशिष देशमुख म्हणाले, मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हाबँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता. आज १९,२० वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती त्या ठीकाणी केली.

ॲड. आसिफ कुरेशी हे महाराष्ट काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली आहे.

“हे १५० जरी नागपूर जिल्हा बँकेचे असले तरी वर्धा, उस्मानाबाद सहकारी बँकेचे मिळून २१० कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोर्टात खटला सुरु आहे. त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवण हे काही सरकारला शोभत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सुनील केदार यांना बडतर्फ कारावं”, अशी मागणी देखाल अशिष देशमुख यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

News Desk

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली, राऊतांचा खळबळजनक दावा

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

News Desk