HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेता भरत जाधवची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ विनंती

मुंबई | कोरोनामुळे देशातील सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिनेक्षेत्रातलाही मोठ्या प्रमाणात लाॅकडाऊनचा फटका बसला. जानेवारी उजाडला तरी राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडली नव्हती. त्यानंतर अभिनेत्यांनी विविध माध्यमातून मागणी केल्यानंतर सरकारने ५०% क्षमतेने सिनेमागृहे चालू केली होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येईल अशी चिंता कलाकारांना सतावत आहे. त्यामुळे मराठी अभिनेता भरत जाधव यांनी लाॅकडाऊन न करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असं संकट कोसळू नये. नाटक आज पुर्णपणे सावरलं नाही. अशात पुन्हा त्याचा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेलं. त्याचा थेट परिणाम आमच्या उपजिवीकेवर होतो. आता राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे, असं भरत जाधव म्हणाले.

कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लाॅकडाऊन करू नका अशी विनंती आधी देखील केली होती. परंतू कोरोना प्रसार वाढत असेल तर लाॅकडाऊन करावाच लागेल. जर हा निर्णय घ्यावाच लागलाच तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, अशी माहिती भरत जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात सर्वात जास्त फटका उद्योग क्षेत्राला बसला. तर सिनेक्षेत्रातील कलाकार वेबसिरीजकडे वळालेली दिसली. सिनेक्षेत्रावर इतर क्षेत्रातील लोकांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून असतो. यावर सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

News Desk

राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 120 जणांचा कोरोनाने घेतला बळी!

News Desk

महाविकासआघाडी सरकारने सत्तेसाठी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, विनायक मेटेंचा गंभीर आरोप 

News Desk