HW News Marathi
महाराष्ट्र

‘राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही’, भास्कर जाधवांचा इशारा

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात तिखट शब्दात वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही राणेंवर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. त्यांनी राणेंना शाप दिला होता. त्यामुळेच राणे काहीही बरळत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

राणे असं का बडबडत आहेत?

नारायण राणे यांच्याविरोधात संतापजनक वक्तव्य येत आहेत. राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना दिलेला शाप होता. बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे ते जे भविष्यवाणी करायचे ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे, असं जाधव म्हणाले आहेत.

राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही

भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना नेस्तानाबूत करण्याचा इशारा दिला आहे. मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं राणे आणि त्यांचे दोन पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणयाचं हे तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहे. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्ये चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही राणेचं वक्तव्य संतापजनक आहे. यापूर्वीही त्यांनी घाणेरड्या भाषेत वक्तव्य केली आहेत, असं सांगतानाच राणेंनी कानाखाली मारेल म्हणून सांगितलं… ज्या पद्धतीने शिशुपालाचे शंभर गुन्हे झाले होते. त्याप्रमाणे राणेंचे हे शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती, वैचारीक भूमिका राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विनायक राऊतांनी मोदींना लिहिलं पत्र

विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पदावरून काढण्यात यावे अशी मागणी आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, केंद्रीय मंत्रिमंडळाला मंत्री नारायण राणे यांना हटवण्याची विनंती केली. नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.

राष्ट्रवादी कडून अटकेची मागणी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द काढल्याने आता राजकारण चांगलंच पेटलं आहे. नारायण राणेंच्या अटकेवरून आता राजकारणी आपली प्रतिक्रिया मांडत आहेत. राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही संताप व्यक्त केला आहे. तसंच राष्ट्रवादी कडूनही अटकेची मागणी करण्यात अली आहे. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणं म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी वागत असेल तर कारवाई झालीच पाहिजे”, असा आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नारायण राणे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात झाली चोरी 

News Desk

‘अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश’ -धनंजय मुंडे

News Desk

मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला

News Desk