HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSCची पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

मुंबई | राज्यातील MPSCची पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ११ एप्रिल रोजी MPSCची पूर्व परीक्षा होणारी होती.मात्र, आता ही परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. सरकारने अखेर या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

महाविकासआघाडीच्या नेते, विरोधकांसह विद्यार्थ्यांची देखील हीच मागणी होती कि MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलावी. त्यानंतर अखेर ठाकरे सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी देखील याबाबतची मागणी केली होती. “MPSC ची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी” अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केल्याचे वृत्त होते.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे हीच केली होती. “सध्याची कोरोनाची स्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात” अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ठाकरे सरकारचा निर्णय !

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने काही कडक पावले उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर, विकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी देखील अनेक कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यातील याच कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर, MPSCपूर्व परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वी देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. जी मागणी विचारात घेऊन ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? नाना पटोलेंचा सवाल

News Desk

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांना गुड न्यूज, सीरम Covovax ची चाचणी सुरु करणार

News Desk

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

News Desk