HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांनी ‘या’ निमित्ताने आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे !

मुंबई | “भाजपने कधीही दबावाचे राजकारण केले नाही. कोणावर दबाव टाकून त्यांना आमच्या पक्षात असे सांगण्याची वेळ आता भाजपवर राहिलेली नाही. आमच्या पाठीशी जनता आहे, नरेंद्र मोदींसारखा नेता आहे. त्यामुळे आम्हाला दबावाचे राजकारण करण्याची आवश्यकताच नाही. आता मला असे वाटते कि शरद पवारांनी या निमित्ताने आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पुणे येथील पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. दरम्यान, शरद पवार यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्रांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे.

“भाजपने कधीही दबावाचे राजकारण केले नाही. कोणावर दबाव टाकून त्यांना आमच्या पक्षात असे सांगण्याची वेळ आता भाजपवर राहिलेली नाही. भाजप कोणाच्या मागे धावेल, अशी भाजपची परिस्थिती आता राहिलेली नाही. उलट आता लोकच भाजपच्या मागे येतात. त्यातले जे चांगले आहेत, लोकाभिमुख आहेत अशा निवडक लोकांना आम्ही घेऊ. इतरांना दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर ते तिथे जातील”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्हाला ‘अशा’ लोकांची आवश्यकता नाही !

“राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे खूप आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु, भाजप त्यातल्या काही निवडक लोकांनाच घेईल. ज्यांची कोणाची ईडीकडून चौकशी सुरु आहे, अशा कोणालाही भाजपमध्ये घेणार नाही. आम्हाला अशा लोकांची आवश्यकता नाही”, असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

मी पवारसाहेबांना आठवण करून देतो कि…!

“मी पवारसाहेबांना आठवण करून देतो कि गेल्या ५ वर्षांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अनेक साखर कारखान्यांना अडचणीच्या वेळी सरकारच्या माध्यमातून, राज्य बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत केली. त्यांना काय आम्ही पक्षात या असे सांगितले नाही. राज्य सरकारच्यावतीने मदत झालेल्यांची यादी मोठी आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची आवश्यकता नाही”, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजगड’समोर फेरीवाले, मनसेचा पालिकेच्या निर्णयाविरोधात मोर्चा

swarit

“अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू”, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला  

News Desk

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna