HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली महापौर विजयाने पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होण्यावर शिक्कामोर्तब !

मुंबई | पूणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते आणि त्याच्यावर सांगली महापौर विजयाने शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी दिली आहे. आज (२३ फेब्रुवारी) सांगली महापौर पदाची निवडणूक झाली असून भाजपाचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि सांगली पालकमंत्री जयंत पाटील यांचे हे काम नक्कीच उल्लेखनीय आहे असेही महेश भारत तपासे यांनी सांगितले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते परंतु पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याची जोरदार टीका महेश भारत तपासे यांनी केली आहे. भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिले असल्याचेही महेश भारत तपासे यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : मुंबईनंतर आता पुण्यात रॅपिड टेस्ट किट्सचा वापर

News Desk

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk

महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही !

News Desk