HW News Marathi
Covid-19

दहावीच्या परीक्षांसाठी उच्च न्यायालय तर बारावीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष

मुंबई । १० वीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णयच रद्द करावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका पुण्याचे प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज (३ जून) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात १० वी आणि १२ वीच्या परीक्षांबाबत नेमकी काय सुनावणी होते याकडे लक्ष आहे.

दुसरीकडे १० वी परीक्षांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या प्राध्यापक कुलकर्णींच्या याचिकेवर इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करण्यात आली आहे.

बालहक्क कार्यकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी उच्च न्यायालयात कुलकर्णी यांची याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारचा निर्णय रद्द करु नये. जगभर कोरोनामुळे परीक्षा रद्द होत आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर प्रमोट केल जात आहे, असे अनुभा श्रीवास्तव यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

केंद्राकडून CBSE बारावीच्या परीक्षा रद्द ! सर्वोच्च न्यायालयात देणार निर्णयाची माहिती

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली नुमत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार आपल्या या निर्णयाची माहिती देईल. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेताना असे म्हटले की, “विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा हेच सर्वाधिक प्राधान्य असेल. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम आता संपायला हवा. कोरोनासारख्या तणावपूर्ण आणि आव्हानात्मक वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी याबाबत विद्यार्थ्यांकडे संवेदनशीलतेने पाहावे”, अशी आशा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज पत्रकार परिषद

News Desk

पुण्यात ३ दिवस केवळ दुध आणि मेडिकल सेवाच सुरु राहणार

News Desk

साताऱ्यानं राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना पॉझिटिव्हीटी रेटमध्ये अग्रेसर

News Desk