HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप- राष्ट्रवादीचं ठरलचं तर शपथविधी झाल्यावर कळेल,चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान…

पुणे | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनेक घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.राज्यातील महाविकासआघाडी सरकार जाण्याचे मुहुर्त पुन्हा विरोधकांनी सांगायला सुरूवात केली आहे.आता ही चर्चा रंगण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेली कथित भेट. गुजराती वृत्तपत्राने ही भेट झाल्याचा दावा केला आहे दुसरीकडे ही भेट झाली नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे, तर अमित शहा यांनी या प्रकरणावर सुचक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालु आहे.

पवार-शहा भेटीमुळे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीच समिकरण पुन्हा पाहायला मिळणार का अशी चर्चा चालु असताना चंद्रकांत पाटील आज म्हणाले की,भाजप आणि राष्ट्रवादीत काही ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल. राजकारण राजकारणाच्या जागी असतं. मात्र नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलिकडच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून गाठी भेटी कमी झाल्या आहेत. अमित शहा आणि पवारांची भेट ही राजकीय कारणासाठी होईलच असे नाही. त्यामागे एखादं समाजोपयोगी काम देखील असु शकतं, असं पाटील म्हणाले.

पवार-शहा भेटीबद्दल चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

पवार आणि शहा यांच्यात भेट झाली की नाही हे मला माहित नाही. पण अमित शहा यांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी. राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये भेट झाली नाही हे सांगायची चढाओढ लागली आहे. त्यांच्या या चढाओढीमुळे भेट झाली आहे हे सिद्ध होत आहे. महाविकास आघाडीचे नेते वारंवार सांगतात की सरकारला कोणताही धोका नाही. यावरून सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही हे सिद्ध होत आहे, असं देखील माध्यमांशी बाेलताना पाटील यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

सब चीजे सार्वजनिक नही होती,अमित शहांचं सूचक वक्तव्य

सब चीजे सार्वजनिक नही होती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं आहे. दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकराच्या समीकरणात काही बदल होणार का? राजकीय खेळी पलटणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांची साथ न दिल्याने शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज?

News Desk

विधानपरिषदेत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला अर्थसंकल्प

Aprna

भाजपला जश्याच तशे उत्तर देऊ

News Desk