HW News Marathi
देश / विदेश

…तर पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल !

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा राजकीय बदलांचे वारे वाहू लागल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मोठे नेते अमित शाह यांच्यातील गुप्तभेटीच्या बातम्या येत आहेत. त्यावर येणाऱ्या अनेक उलटसुलट चर्चांमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकीकडे, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर भाजपचे प्रमुख नेते फोन करुन त्यांची विचारपूस करत आहेत. मात्र, दुसरीकडे दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. सोमवारी (२९ मार्च) जिंदल यांनी यासंदर्भात एक ट्विट करत गंभीर आरोप केला आहे.

नवीन कुमार जिंदल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की ज्यामुळे शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है”, असे ट्विट नवीन कुमार जिंदल यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर आणखी एक मोठे विधान यावेळी नवीन कुमार जिंदल यांनी केले आहे.

…तर पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल !

नवीन कुमार जिंदल आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, “सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की ज्यामुळे शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रेमडेसिविरची साठेबाजी म्हणजे मानवतेविरोधी”, प्रियांका गांधींनी देवेंद्र फडणवीसांना झापलं

News Desk

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

News Desk

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ, पुरोगामी विचारवंतांच्या सुरक्षेत केली वाढ

News Desk