HW News Marathi
महाराष्ट्र

‘साकीनाका बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार’, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई। मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणात त्या पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अनेक राजकारणी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हि केस चालवावी अशी मागणी अनेक राजकारणी करत आहेत. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खात्री पटवून दिली आहे.

बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात

साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडितेला योग्य वेळी न्याय मिळावा या साठी ही केस फास्ट ट्रक कोर्टवर चालवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होत होती. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला असून खैरानी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याची माहिती दिली. पोलिस तिथे पोहोचली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती महिला जखमी आढळली. तिला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवलेला आढळून आला.

मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं

मुंबईत साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने अक्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. बरेच नेते मंडळी संताप व्यक्त करत आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. . या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना झापलं आहे. साकीनाक्यातील दुर्देवी घटनेचं राजकारण करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर त्यांनी विरोधकांना देखील सुनावलं आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं ते म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Aprna

देशात समान नागरी कायदा असावा असे कुणाला का वाटू नये?, सामनातून सवाल

News Desk

देख लिया “७० साल मे कुछ नही हुआ.. देख लिया… !

News Desk